पाठ्यपुस्तकांमध्ये वहीची पाने जोडण्या बाबत आपले मत नोंदवणे
पाठ्यपुस्तकांमध्ये प्रामुख्याने क्रमिक पाठ्यक्रमावर आधारित पाठ्यांश दिला जातो. महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्था ही गोरगरिबांपासून ते श्रीमंतांपर्यंत एकसमान शिक्षण देण्यासाठी निर्माण केलेली आहे. पाठ्यपुस्तके ही त्याचाच एक भाग आहे. गरिबांच्या किंवा गरीब शेतकऱ्यांच्या मुलांना वह्या विकत घेणे देखील अनेकदा परवडत नाही. त्यामुळे त्यांचे शाळेमधील शिक्षण/ वर्ग कार्य योग्य प्रकारे घडत नाही. हे लक्षात घेऊन पाठ्यपुस्तकांमध्येच वह्यांची पाने देण्याबाबतचे नियोजन शासन स्तरावर सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून, शाळेत प्रत्यक्ष शिकवणाऱ्या शिक्षकांकडून या संदर्भाने वास्तववादी माहिती मिळवण्यासाठी ही छोटीशी प्रश्नावली तयार केलेली आहे. पाठ्यपुस्तकातील वह्यांची पाने समाविष्ट करण्याची निकड जाणून घेण्यासाठी आपल्या कामातून पाच मिनिटे वेळ यासाठी काढून ही प्रश्नावली जरूर भरून पाठवावी. तसेच विद्यार्थ्यांसाठी तळमळीने काम करणाऱ्या इतर शिक्षकांनादेखील ही प्रश्नावली भरण्यास प्रवृत्त करावे, ही विनंती. एखाद्या वेळेस हा निर्णय महाराष्ट्रातल्या शिक्षण व्यवस्थेसाठी दूरगामी परिणाम करणारा ठरेल. आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे.
आपले मत नोंदवण्यासाठी खाली क्लीक करा.
पुस्तकात पाने समाविष्ट केल्यामुळे पुन्हा एकदा दप्तराचे ओझे वाढणार आहे.तेव्हा पुस्तकात पाने समाविष्ट न करता पाठनिहाय वेगळी नोंद वाही द्यावी.
उत्तर द्याहटवापाठनिहाय वेगळी वही देण्यापेक्षा जर पाठ्यपुस्तकातच विभागणी केली गेली ;म्हणजे सत्रावर आधारित पाठ्यपुस्तकांची निर्मिती (प्रथम व द्वितीय सत्रा साठी वेगवेगळे पुस्तक )केली गेली तर दप्तराचे ओझही कमी होऊ शकतं आणि उद्देश ही सफल होऊ शकतो,असा मला वाटतं.
उत्तर द्याहटवा